पत्रकारितेत AIचा प्रभाव वाढतोय; महिला पत्रकारांनी तंत्रज्ञान स्वीकारावे – ब्रिजेश सिंह

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
2 Min Read
Ai Impact Journalism Women Journalists Bridgesh Singh

पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मोठे बदल घडवत असून या बदलांकडे संधी म्हणून पाहत महिला पत्रकारांनी अधिक तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ब्रिजेश सिंह यांनी केले.

राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ या कार्यशाळेत ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम पार पडला.

ब्रिजेश सिंह म्हणाले की, AI हे पत्रकारितेतील वेग वाढवणारे प्रभावी साधन आहे. माहिती संकलन, भाषांतर आणि विविध प्लॅटफॉर्मवर सादरीकरण यासाठी AI चा उपयोग करून कामाची गुणवत्ता सुधारता येते. त्यामुळे पत्रकारांना विश्लेषणात्मक आणि संशोधनात्मक कामासाठी अधिक वेळ मिळतो.

सांगलीत सोशल मीडिया मार्केटिंग करायचय : Social Media Marketing Agency in sangli आहेच ना

मात्र, AI हे मानवी संदर्भांवर आधारित असल्याने त्यात चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे AI वापरताना तथ्यांची अचूकता तपासणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिला पत्रकारांनी केवळ पारंपरिक क्षेत्रांपुरते मर्यादित न राहता गुन्हे, राजकारण आणि इतर क्षेत्रांतही AI चा वापर करून प्रभावी वार्तांकन करावे, असे आवाहन त्यांनी केले. बदलत्या काळात आघाडीवर राहण्यासाठी तांत्रिक कौशल्य विकसित करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रादेशिक भाषांमध्ये AI चा वापर वाढवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. ‘इंडिक AI’ टूल्समुळे ग्रामीण भागातील माहिती स्थानिक भाषेत सहज पोहोचवणे शक्य होत असून त्यामुळे माहितीचा प्रसार अधिक व्यापक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

AI वापरासोबत नैतिक नियमावलीचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, युरोपमध्ये अशा नियमांची अंमलबजावणी सुरू आहे आणि भारतातही अशा प्रकारची स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत.

या कार्यशाळेत महिला पत्रकारांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण सुरू करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा: राज्यात 20 ते 24 एप्रिल वादळी पाऊस व गारपीटचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.inअनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.”कार्यक्षेत्र (Areas of Focus)सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंकGR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरणसरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहितीकृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावाशिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवासंपादकीय दृष्टी (Editorial Vision)> “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख