एसटीचा तोटा कमी करण्यासाठी मोठे पाऊल; सुधारणा आराखड्याचे निर्देश – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
1 Min Read
Msrtc Loss Reduction Plan Pratap Sarnaik

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) वाढता तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. एसटी मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनिक शिस्त आणि संसाधनांचा प्रभावी वापर यावर भर दिला.

या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते.

2025-26 या आर्थिक वर्षात एसटीचे एकूण उत्पन्न 11,475 कोटी रुपये तर खर्च 12,066 कोटी रुपये झाला. दैनंदिन सरासरी उत्पन्न सुमारे 31.40 कोटी रुपये असून खर्च 33 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक तूट भरून काढण्यासाठी व्यापक सुधारणा आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

मागील वर्षात जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे विभाग नफ्यात होते. मात्र उर्वरित 23 विभागांनी कामगिरीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन, उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर यावर भर देऊन दैनंदिन तोटा कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार आहे. तोट्यातील विभागांची सखोल चौकशी करून त्यामागील कारणे शोधून त्यावर उपाययोजना राबवण्याचे निर्देशही देण्यात आले.

विशेषतः नागपूर विभागातील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यावरही मंत्री सरनाईक यांनी भर दिला.

हेही वाचा: महिलांचा 50% सहभागाशिवाय देशाचा विकास अशक्य – ‘नारीशक्ती वंदन’ संमेलनात मुख्यमंत्री फडणवीस.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.inअनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.”कार्यक्षेत्र (Areas of Focus)सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंकGR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरणसरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहितीकृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावाशिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवासंपादकीय दृष्टी (Editorial Vision)> “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख